नीट-पीजी परिक्षा १५ जूनला एकाच सत्रात, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

0

नवी दिल्ली : नीट आणि पीजी परिक्षा दोन सत्रांमध्ये घ्याव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान देशभरात विविध केंद्रांवर होणाऱ्या परीक्षा आता १५ जूनला एकाच सत्रात होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामध्ये परीक्षा एकाच सत्रात घेतल्याने पारदर्शकता राहील. तसेच यामुळे विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल. त्याचप्रमाणे दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकांच्या स्तरामध्ये भिन्नता निर्माण होऊ शकते, अशा प्रकारचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दोन सत्रांत परीक्षा घेण्याच्या निर्णयाने मनमानी आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक निर्णय आहे. दोन सत्रांत परीक्षा घेतल्याने मनमानीची शक्यता वाढेल. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका बिनचूक एकसमान कठीण असतील याची खात्री देता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट कले. त्यामुळे येत्या १५ जूनला या परीक्षा होणार आहेत. त्यापूर्वी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या परीक्षांसाठी अजून बराच अवधी असल्याने परीक्षा मंडळांकडे परीक्षा केंद्र ठरवण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून ही परीक्षा दोन सत्रामध्ये होणार का यावर तोडगा निघाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देत म्हटलंय की, बोर्डाने पारदर्शकपणे परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था करावी. १५ जूनला होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अद्यापही वेळ आहे. दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या सवलतीशी संबंधित मुद्द्यावर परीक्षा संपल्यानंतर विचार केला जाईल असं कोर्टाने सांगितले. जरी परीक्षा मंडळाने अधिक केंद्रे ओळखण्याचा संदर्भ दिला तरी त्याला अधिक वेळ लागू शकतो. ज्यामुळे परीक्षा आयोजित करण्यास विलंब होऊ शकतो आणि सर्व परिणामी केंद्र आणि प्रवेश इत्यादी गोष्टी या न्यायालयाने ठरवलेल्या वेळेच्या मर्यादेनुसार होणार नाहीत असा प्रतिवादींच्या वतीने एक युक्तिवाद मांडण्यात आला आहे. हा युक्तिवाद देखील फेटाळण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech