आतापर्यंत २८५८ भारतीयांची यशस्वी सुटका करण्यात आली
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत, मंगळवारी रात्री उशिरा इराणमधील मशहाद येथून आणखी एक विशेष विमान २८२ भारतीय नागरिकांना घेऊन भारतात परतले. संकटग्रस्त इराणमधून बाहेर पडणाऱ्या लोकांचे चेहरे त्यांच्या सुरक्षित परतीबद्दल उजळले. आतापर्यंत ऑपरेशन सिंधू अंतर्गत २८५८ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटर (एक्स) पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी २५ जून रोजी रात्री १२ वाजता इराणमधील मशहाद येथून एक विशेष विमान २८२ भारतीयांना घेऊन नवी दिल्लीला पोहोचले. आतापर्यंत २८५८ भारतीय नागरिकांना इराणमधून घरी परत आणण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून नवी दिल्लीला पोहोचलेल्या एका भारतीय नागरिकाने दूतावास आणि भारत सरकारचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, घरी परतल्यानंतर मला बरे वाटत आहे. त्यांनी देवाचे आभार मानले आणि सांगितले की मी आता येथे आहे. त्यांनी भारतीय दूतावासाचे त्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल आभार मानले.