केंद्र सरकारकडून बिहारला मिळाले पूर्ण सहकार्य – नितीश कुमार

0

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी केंद्र सरकारकडून बिहारला १३ हजार कोटी रुपयांहून अधिकची भेट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गयाजी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त आयोजित जनसभेला संबोधित करताना त्यांनी गयाजीमध्ये झालेल्या विकासकामांचा उल्लेखही केला. त्यावेळी ते म्हणाले की, बिहारला केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. यंदाच्या बजेटमध्येही बिहारला विशेष पॅकेज देण्यात आले आहे. असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, बिहारला “खेलो इंडिया यूथ गेम्स”चे यजमानपदही मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज या सर्व क्षेत्रांत कामे सुरू आहेत. अलीकडेच काही नवीन कामेही करण्यात आली आहेत. काही नवीन निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा पेन्शन ४०० रुपयांवरून वाढवून ११०० रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, गया शहराचे नाव आम्ही “गयाजी” केले. आधी शहराचे नाव फक्त “गया” होते. आता याचे नाव “गयाजी” झाले आहे. एका बाजूला बोधगया आहे आणि दुसऱ्या बाजूला गयाजी. गयाजीमध्ये आम्ही फल्गु नदीवर रबर डॅम आणि पूल बांधले. बोधगयामध्येही अतिथिगृहासह अनेक बांधकामे करण्यात आली.

राज्याच्या मागील सरकारांवर निशाणा साधत नितीश कुमार म्हणाले की, पूर्वी बिहारची खूपच वाईट अवस्था होती. लोक नीट कपडेही घालू शकत नव्हते. महिलांसाठी कोणी काम केले नव्हते. मुस्लिम समाजासाठीही काही केले गेले नव्हते. आम्ही सर्वांसाठी काम केले. आमची सरकार सर्वांना फायदा देण्याचे काम करत आहे. २०१८ सालीच राज्यातील प्रत्येक घरात वीज पोहोचवली. लोकांना आधीच कमी पैशांत वीज दिली जात होती आणि आता १२५ युनिट वीज मोफत दिली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech