नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून पोस्ट करत सोनम वांगचुक यांनी लिहिले, “हा लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे.” सध्या गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वांगचुक यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, रस्त्यांवरून उदयास आलेल्या आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेपर्यंत पोहोचलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा हा विजय आहे.
त्यांनी लिहिले की, हा शांतता, संयम आणि चिकाटीचाही विजय आहे. वांगचुक यांनी सरन्यायाधीश, देशाची ‘जेन-झेड’ पिढी आणि भीतीचे वातावरण मागे टाकून देशाच्या कानाकोपऱ्यातून आवाज उठवणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, जनतेची एकजूट आणि शांततापूर्ण आवाजांनी उत्तरदायित्वाचा मार्ग मोकळा केला आहे. आपल्या संदेशात वांगचुक म्हणाले की, आता उत्तरदायित्व निश्चित झाल्यानंतर सुधारणांसह पुढे जाण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले की, हे केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नसून व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक संधी आहे.