बांगलादेश सीमा बंदचा कांदा निर्यातीला फटका, शेतकरी अडचणीत

0

लासलगाव : गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातोवर घातलेल्या बंदीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका देशातील कांदा उत्पादक ठिकरी आणि व्यापाऱ्यांना बसत असून, नियांतीवरील अवलंबित्वामु‌ळे कांद्याचे बाजारभावही कोसळत नाहेत. भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास ४० टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशकडून खरेदी होतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४.८० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती. ज्यातून देशाला १७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. त्यामुळे देशातून ४० टक्के एवढा मोठ्या प्रमाणात कांदा एकट्या बांगलादेशमध्ये विकला जातो, मात्र, बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याची कोंडी केल्याने देशामध्ये मुबलक कांदा उपलब्ध आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा प्रचंड झाल्याने कांद्याचे दरही १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलच्या घरामध्ये अडकलेले आहे.

बांगलादेशकडून आयात थांबवण्यात आल्याने महाराष्ट्रातील विशेषतः लासलगाव, नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर भागातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यंदा रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे बंपर उत्पादन झालेले असताना निर्यात बाजार बंद झाल्याने स्थानिक बाजारात पुरवठा वाहत असून, भावही परवडण्यासारखे नसल्याचे शेतकरी बोलत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. भारतातून बांगलादेशला दररोज दोन नंबर गुणवत्ता असलेल्या शेकडो ट्रक कांद्याची निर्यात होत होती. सध्या ती पूर्णपणे थांबली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही संकटात आले आहेत. सरकारने कांदा निर्यात पूर्ववत सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. – मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech