हल्ल्यानंतर मी काही वेळ धक्क्यात होते, मात्र आता मी बरी- मुख्यमंत्री रेखा गुप्ता

0

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले आहे की, हल्ल्यानंतर त्या धक्क्यात होत्या. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अशा प्रकारचे हल्ले त्यांना काम करण्यापासून थांबवू शकत नाहीत. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी लिहिले की, “आज सकाळी जनसुनावणी दरम्यान माझ्यावर झालेला हल्ला केवळ माझ्यावरच नव्हे, तर दिल्लीची सेवा आणि जनहितासाठी घेतलेल्या आमच्या संकल्पावर करण्यात आलेला एक भ्याड प्रयत्न आहे. स्वाभाविक आहे की या हल्ल्यानंतर मी काही वेळ धक्क्यात होते, मात्र आता मी बरी वाटत आहे. मी माझ्या सर्व शुभचिंतकांना नम्र विनंती करते की कृपया मला भेटण्यासाठी त्रास करून घेऊ नका. मी लवकरच पुन्हा तुमच्यात काम करताना दिसेन.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाल्या, “अशा प्रकारचे हल्ले माझा आत्मविश्वास किंवा जनतेच्या सेवेसाठी घेतलेला संकल्प कधीही खच्ची करत नाहीत. आता मी यापेक्षा अधिक ऊर्जा आणि समर्पणासह तुमच्यात कार्यरत राहीन. जनसुनावणी आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण पूर्वीप्रमाणेच गांभीर्याने आणि प्रतिबद्धतेने सुरू राहील. “तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्या अपार प्रेमासाठी, आशीर्वादांसाठी आणि शुभेच्छांसाठी मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते.”

बुधवारी(दि.२०) सकाळी सिव्हिल लाइन्स येथे असलेल्या त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये ‘जनसुनावणी’ कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर चौकशी सुरू आहे. हल्ल्यानंतर उत्तर दिल्लीच्या डीसीपीसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपीची ओळख गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी राजेश भाईजी अशी झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech