मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला; १६ तासांनंतरही वाहतूक ठप्प

0

मुंबई : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातानंतर तब्बल १६ ते १८ तास उलटूनही रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर हजारो वाहने अडकली असून दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातस्थळाजवळ रात्रीभर वाहने रस्त्यावरच उभी राहिली. त्यामुळे महिला आणि लहान मुलांसह प्रवाशांना अन्न, पाणी किंवा शौचालयाची कोणतीही सुविधा नसताना तासन्‌तास अडकून राहावे लागले. वाहतूक व्यवस्थेतील गोंधळामुळे सकाळपर्यंत ही कोंडी तब्बल १२ किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की टँकरमधून अजूनही ज्वलनशील प्रोपिलीन वायूची गळती सुरू आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि बीपीसीएलच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. सामान्य वाहतुकीला परवानगी देण्यापूर्वी ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, वाहतूक सुरळीत होईपर्यंत एक्सप्रेसवेवर प्रवास टाळावा. एक्सप्रेसवे नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता महामार्गावर हा गॅस टँकर उलटला. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील आदोशी बोगद्याजवळ उतारामुळे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला. अपघातानंतर तात्काळ टँकरमधून वायूची गळती सुरू झाली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech