“सैन्याची बदनामी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे”- उच्च न्यायालय

0

राहुल गांधींना खडसावत याचिका केली रद्द
लखनऊ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात मोठा धक्का दिला आहे. देशाच्या सैन्यासंदर्भात अपशब्द सहन केले जाणार नाही असे सांगत अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडापीठाने राहुल गांधींना खडसावले. तसेच त्यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला फेटाळून लावला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सैन्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याविरोधात एका माजी सैन्य अधिकाऱ्याने राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधीं दाखल याचिका फेटाळून लावताना हायकोर्ट म्हणाले की, सैन्याची बदनामी करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे. भारतीय संविधानाच्या कलम १९ (१) (अ) नुसार निःसंशयपणे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याची हमी दिली जाते. परंतु हे स्वातंत्र्य वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे आणि त्यात कोणत्याही व्यक्ती किंवा भारतीय सैन्याविरुद्ध अपमानास्पद विधाने करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नाही. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या एकल खंडपीठाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली.

राहुल गांधी यांनी त्यांच्या याचिकेत फेब्रुवारी २०२५ मध्ये लखनऊच्या खासदार-आमदार न्यायालयाने दिलेल्या समन्स आदेश आणि मानहानीच्या खटल्याला आव्हान दिले होते. हा खटला बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित असून सध्या लखनऊ न्यायालयात प्रलंबित आहे. तक्रारीनुसार, राहुल गांधींनी १६ डिसेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. ही टिप्पणी ९ डिसेंबर २०२२ रोजी भारत-चीन सैन्यांमधील झालेल्या संघर्षाशी संबंधित होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech