सिंधू पाणी करारावरून शहबाज शरीफ यांची भारताला धमकी

0

इस्लामाबाद : पाकिस्तान सैन्यप्रमुख असीम मुनीर आणि बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला सिंधू करारावरून धमकी दिली आहे. एका कार्यक्रमात शरीफ यांनी म्हटले की, “भारताला पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावून देऊ दिला जाणार नाही.”

शरीफ म्हणाले, “आज मी शत्रूला सांगू इच्छितो की जर तुम्ही आमचे पाणी अडवण्याची धमकी देता, तर हे लक्षात ठेवा की तुम्ही पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावू शकणार नाही.” त्यांनी इशारा दिला की जर भारताने अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली, “तर तुम्हाला असा धडा शिकवला जाईल की तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.”

पाकिस्तानच्या या धमक्यांना भारताने ठाम आणि कडक उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, “पाकिस्तानकडून अण्वस्त्रांच्या धमक्या देणे ही काही नवीन गोष्ट नाही. भारत कधीही अशा अणु धमक्यांपुढे झुकणार नाही आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व पावले उचलेल.” भारताने हेही स्पष्ट केले की अशा बेजबाबदार विधानांमुळे पाकिस्तानच्या अणु कमांड व नियंत्रण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

माहितीनुसार, पाकिस्तानच्या लष्कराला जेव्हा अमेरिकेचा पाठिंबा मिळतो, तेव्हा ते आक्रमक भूमिका घेते. ही बाब दर्शवते की पाकिस्तानमध्ये लोकशाही कमजोर आहे आणि प्रत्यक्ष सत्ता लष्कराच्या हाती आहे. भारताने स्पष्ट केले आहे की तो ना दहशतवादाच्या दबावाला बळी पडेल, ना आक्रमक विधानांना डगमगेल. आपली धोरणे तो स्वतः ठरवेल. दरम्यान, सिंधू नदीच्या थेंबांमध्ये आता केवळ पाणीच नाही, तर हे दोन्ही देशांमध्ये उद्भवू शकणाऱ्या नव्या युद्धाचे कारणही बनू शकते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech