नवी दिल्ली : अॅक्सिओम ४ मोहिमेतून परतलेले भारतीय अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की, भारत अवकाशातून सगळ्यात सुंदर दिसतो. शुभांशू शुक्ला यांनी राष्ट्रीय माध्यम केंद्रात पत्रकार परिषदेत अॅक्सिओम-४ मोहिमेच्या सुरुवातीपासून ते यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अवकाश राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह आणि इस्रोचे अधिकारी देखील उपस्थित होते.
शुक्ला म्हणाले की, कितीही प्रशिक्षण घेतले असले तरी, त्यानंतरही, जेव्हा तुम्ही रॉकेटमध्ये बसता आणि इंजिन सुरू होते तेव्हा एक वेगळीच भावना असते. ते शब्दात वर्णन करता येत नाही. हा अनुभव अविश्वसनीय होता, प्रवास रोमांचक आणि अद्भुत होता. त्यांनी सरकार, इस्रो, शास्त्रज्ञ आणि नागरिकांचे आभार मानले ज्यांनी हे अभियान शक्य केले.अंतराळवीर शुक्ला म्हणाले की, हे अभियान भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचा आणि जागतिक अवकाश सहकार्याचा एक मजबूत पुरावा आहे. अंतराळात घालवलेल्या प्रत्येक क्षणाने आपल्याला केवळ तांत्रिक उत्कृष्टतेचा अनुभव दिला नाही तर मानवतेसाठी नवीन शक्यतांचे दरवाजेही उघडले.