विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली वेगवान; बच्चू कडूंच्या राजकीय भवितव्यावर चर्चा

0

अमरावती : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये नव्या समीकरणांची चाचपणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) सध्या रणनीती आखत असून बच्चू कडून यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बच्चू कडून यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यासाठी प्रहार जनशक्ती पार्टीचा शिवसेनेत विलय करण्याची अट पुढे ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या संभाव्य अटीमुळे बच्चू कडून यांच्यासमोर पेच निर्माण झाला असून, स्वतंत्र पक्षाची ओळख कायम ठेवायची की विधान परिषद सदस्यत्वाची संधी स्वीकारायची, असा द्वंद्व निर्माण झाल्याचे मानले जात आहे. विदर्भात प्रभावी दबाव गट म्हणून ओळख असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीच्या संभाव्य विलयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. दरम्यान, या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर घेतले जाणारे निर्णय राज्याच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech